Skip to main content

Posts

शक्तीरहस्य: मन जड की अजड (matter or non-matter)

स्वामी विज्ञानानंद यांचे पुस्तक शक्तीरहस्य: हे पुस्तक म्हणजे "अंनिस" च्या शाम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी स्वामी विज्ञानानंदांना विचारलेल्या प्रश्नांतून झालेली चर्चा आहे. पहिला भाग हे स्वामीजींनी केलेली प्रस्तावना असून दुसरा भाग शक्ती चर्चा असा आहे. तो संपूर्ण पणे स्वामीजी व अनिस चे वरील दोन कार्यकर्ते यांच्या तील चर्चात्मक संवाद आहे. स्वामी विज्ञानानंद यांनी, १. "जड" हे प्रकाशवेगाहून अधिक वेगाने जात नाही जाऊ शकत नाही (आईनस्टाईन) व २. "मन" म्हणजे subject आणि object यांच्यातील पूल ( ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यातला पूल) या पॉवलॉव्ह या शास्त्रज्ञाची व्याख्या, अधिक ३.Quantum Mechanics मधली हायजेनबर्ग ने मांडलेल्या, निरीक्षकामुळे इलेक्ट्रॉन मधील अनिश्चिततेचा सिद्धांत, अशा तीन वैज्ञानिक व्याख्यांचे एकत्रीकरण करुन मनाचे अजडत्वाची मांडणी केली आहे. मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने मन हे अजड आहे असे सिद्ध करण्याचा विज्ञानानंदाचा प्रयत्न होता. मी पहात असलेल्या सूर्याचा किरण माझ्यापर्यंत पोचायला ८ मि. लागली हा विचार काही क्षणार...
Recent posts

वेदोक्त प्रकरण ,लोकमान्य आणि छत्रपति शाहु महाराज

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच...